Contact

Email Address: pratiqppurkar@gmail.com
Call: 8600430005

logo

logo

Friday, November 20, 2020

बकाबाईचा वाडा, महाल, नागपुर

महारानी बकाबाई भोंसले आणि बकाबाईचा वाडा, महाल नागपुर








महाराणी बकाबाई साहेब (ई. स.१७९०-१८५८) नागपूर घराण्याच्या राजे रघुजी-२ यांच्या पत्नी होत्या. १७५५ साली बांधलेल्या ह्या वाड्याचे अधीकार रघुजी-२ यांना मीळाले लग्नानंतर त्या वाड्यात राणी बकाबाई साहेबांना ठेवण्यात आले पुढे हा वाडा बकाबाईचा वाडा ह्या नावानेच प्रसिद्ध झाला, नागपुर संस्थानाचा संपुर्ण कारभार पुढे ह्या वाड्यातनच चालायचा असे म्हटले तरीही अतिशयोक्ती होऊ नये एवढा प्रभाव महाराणी बकाबाईचा तत्कालीन राजकारणावर होता. रघुजी-३ (मृत्यु १८५५) ह्या अल्पवयीन राजाला दत्तक घेऊन तिने राज्यकारभार केला हे दत्तक विधान लॉर्ड डलहौसीने नामंजूर करूनही तिने प्रसंगी इंग्रजांशी जुळवून घेऊन राजाला व स्वतःला येथील प्रशासक म्हणून नियुक्त करून घेतले व त्यापोटी आपल्या हयातभर १८५८ पर्यंत इंग्रजांकडून पेन्शनही मिळवली, असे म्हणतात की तिने ईंग्रजांविरुद्ध १८५७ चा ऊठाव नागपुरात यशस्वि होऊ दिला नाही म्हणून नागपुरातील जनता निशेध म्हणुन आजही पोळ्याच्या पाडव्यावर तीच्या प्रतिकृतीची मिरवणुक काढतात ज्याला "मारबत" असे म्हणतात. 











सध्या हा संपुर्ण वाडा तीन भागात विभाजीत आहे, पुर्वापार हा वाडा भोसल्यांची कचेरी म्हणुन वापरात होताच, येथे निवाडा व्हायचा व कच्च्या कैद्यांचीही व्यवस्था होती आता पुर्वेकडील भाग १९३७ पासन सिटी कोतवाली नामक पोलीस स्टेशन चे वापरतात असुन मध्यभागी १८७० साली निलसीटी हायस्कुल ची स्थापना करण्यात आली जी आता  नागपुर शिक्षण संस्था द्वारा संचालीत श्री. दादासाहेब धनवटे नगर विद्यालय या नावे  आहे, तर पश्चिमेला त्याच संस्थेचे बिंझानी सीटी महाविद्यालय आहे. नागपुरातील व्यस्त महाल परिसरात हा वाडा आहे, असे भरपुर भोसलेकालीन वाडे व महाल या परिसरात असल्यामुळेच या परिसराचे नावच महाल ठेवण्यात आले. 







सदर वाडा १७५५ साली बांधण्यात आला आहे, यावर स्थानिक व तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम शैलीसकटच ब्रीटीश कलोनियल शैलीचाही प्रभाव स्पष्ट जाणवतो, दगडी पायव्यावर भाजलेल्या विटांचे बांधकाम व कमानी यांनी बाह्यभाग सुसज्जीत असुन अंतर्गत काम दगडी व लाकडी असुन छत हे ब्रीटीश पद्धतीच्या लाकडी ट्रसेस वर आधारीत कौलारु आहे. भव्यतेच्या बाबतित हा वाडा कोण्या महालापेक्षा कमी नाहीच, चार चौकांच्या दुमजली वाड्यात असंख्य खोल्या आहेत ज्यामधे आता काही बदल करुन अजुनही वापरात आणल्या जात आहे. 

तळटिप: मी देखील याच शाळेत शिकलो, यावर्षीच शाळेचा १५० वा स्थापणादिवस साजरा करण्यात आला होता, आजकालच्या राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व, वैज्ञानिक, कवि, लेखक, चित्रकार ह्या शाळेचे माजी विद्यार्थी होते व २५ वर्षे पुर्वी जेव्हा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला तेव्हा ह्या संपुर्ण शाळेच्या ईमारतीचे मॉडेल थर्माकोल मधे बणविण्याची संधी मला लाभली होती.


© आर्कीटेक्ट प्रतिक पुरकर, नागपुर

Sunday, June 14, 2020

My pulmonologist always prescribed me cough syrup as I am suffering from allergic cronic rhinitis. In this pandemic situation of #corona_covid_19. He suggest me to take more care and precautions as this viral disease is specifically related with respiratory organ failures. I have just gone through medicines what he have prescribed me and wondered that manufacturer of such medicines is #Corona_Remidies_Pvt_Ltd. 

Meanwhile I have read over some controversy for #hydroxychloroquine a malarial medicine demanded by U.S. as modern medical science believe that #hydroxychloroquine plus #azithromycin is very useful to cure #covid_19. Ok but this is not my point let them decide how to cure #corona. 

Later Aayush Mantralaya prescribed  immunity booster medicine #Arsenic_album_30 which is a homeopathic medicine, and suggested to drink home made kadhas & do gargle using hot water, inhale steam etc. This time Allopathy practitioner make controversy for this kind of medicine. Ok this is also not a my point. 

Now #Patanjali_Ayurvedic_Ltd. Launched cough and respiratory care medicine #coronil in the name of #corona & make a statement that this combination medicines can cure #corona he may be true or false but here again controversy started. Ok but that is not my point too. 

My point is that, from more than last ten years I have tried all these three pathiyes for my chronic disease as mentioned in para one but not cured well. Also If we talking about #covid_19 not a single pathy is sure to cure it, unless and untill reliable vaccine is get invented. This pandemic situation is full of confusion and controversies every agencies are failed to controll this situation. As per para four  Patanjali named their medicine #coronil is opposed & blamed by some group where as a company with name #corona as per para one nobody cares. Ayush Mantralaya not certified #coronil but recommend #Arsenic_album_30. And use of #hydroxychloroquine plus #azithromycin in #covid_19 is still hypothesis causes many deaths. So finally I have decided to left all these things  aside and watch entertaining movie on TV, soon #fair_and_lovely advertisement started claiming that it can change skin complexion lighter in colour. #Complan, #bournvita claiming growth & health of child.... & bla bla bla. 


Ar. Pratik P. Purkar, Nagur

Thursday, April 9, 2020

श्रृंखला-ए-महल

श्रृंखला-ए-महल a series of Heritage walk in Mahal locality of Nagpur city.











It is a good initiative by Architectural Sankul, it was a nice experience to join part 2 of this Heritage walk, thanks to Dr.Madhura Rathod & Ar. Nitika Ramani for organizing visit to such places which has socio-cultural importance as a Heritage site of the Nagpur city. History speaks itself through this monumental evidences which reflects rich legacy of our past, we have experienced that in Mahal Nagpur. 

From my childhood i have seen these structures but there was also some unexplored places for me which I have seen first time in this Heritage walk. Being a citizen of Nagpur I feel proud that this heritage still exists & being architect my opinion is to preserve this valuable assets of our city for future generations, need is to explore, documented, restore and conserve these structures.

Ar. Pratiq P. Purkar, Nagpur 


शिव छत्रपति चे चुलते नागपुरकर भोसले घराण्याचा इतिहास

निमित्त होते नागपूरकर भोसले यांनी निर्माण केलेले ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास दौरा परंतु या दौऱ्यानिमित्त काही हाती आलेल्या माहिती, शिसोदे वंशीय क्षत्रिय कुळातील भोसले परिवाराच्या आजमितीस भारतात चार शाखा आहेत त्या अशा 

एक नागपूरकर भोसले 

दोन सातारकर भोसले 

तीन कोल्हापूरकर भोसले

चार तंजावरकर भोसले

यापैकी नागपूरकर भोसले जे मूळचे सातारा येथील हिंगणी या गावचे आहेत यांना हिंगणीकर भोसले असेही ओळखले जायचे या परिवारातील रघुजी प्रथम याला नागपूर वऱ्हाडात गोंड राणी सोमकुवर हिणे गोंड परिवारा मधील नागपूरच्या गादीसाठी उद्भवलेला संघर्षात मदत मागितली, याबदल्यात राणीने रघुजी प्रथम याला नागपुरातील काही भागांची जहांगीरी दिली त्याद्वारे भोसल्यांनी नागपूरात बस्तान बसवले. व पुढे बंगाल बिहार ओडिसा पर्यंत मजल मारत मराठी स्वराज्य वाढवले. या राजघराण्याचे आताचे तरुण वंशज श्री जयसिंगराव भोसले द्वितीय यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हिंगणीकर भोसले हे चारही भोसले घराण्यात ज्येष्ठ आहेत, हे त्यांच्या वंशावळीवर नजर टाकल्यास सही सिद्ध होते. व त्यामुळेच शिवछत्रपतींना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणारे त्यांचे अध्यात्मिक गुरु श्री रामदास स्वामी हे याही परिवाराचे गुरु आहेत, व चारही परिवारात ज्येष्ठ असल्यामुळे ह्या गुरूंची मूर्ती स्थापनेचा अधिकार त्यांनाच मिळालेला आहे व त्यामुळे त्यांच्या देवघरात आजही श्री रामदास स्वामी यांची चांदीची मूर्ती रोज पुजल्या जाते, तसेच परिवारातील वीर पुरुषांच्या नावे असलेली सोन्याची टाक देखील पूजनात असते. नागपूरकर भोसले श्रीरामांना आपले कुलदेवता मानतात परंतु भोसले घराण्याचे मूळ दैवत ही देऊर ची मुधाईदेवी भवानीमाता असल्याचे ते सांगतात. हे भोसले घराणे दरवर्षी गणेशोत्सवही उत्साहाने साजरा करतात ही परंपरा हिंगणी या गावी असले पासून साजरी करण्यात येते किंबहुना लोकमान्य टिळकांनी या परिवाराचे उदाहरण समोर ठेवूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली असा दावा ते करतात. या परिवाराने नागपुरात निर्माण केलेले वैभव इंग्रजांनी आजमितीस नष्ट केले असले तरीही ते सद्यस्थितीत रहात असलेला मोठा राजवाडा येथे हा वारसा जतन करुन ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये त्यांचे मूळ देवघर, शस्त्रागार, अश्वशाला व काही मंदिरे असा परिसर आज नागपुरातील व्यस्त महाल परिसर या नावाने विख्यात आहे तिथे विविध ठिकाणी यांच्या वंशजांचे नावे विवीध वाडे आजही शाबूत आहेत. आपण तिथे महालक्ष्मी उत्सवात व मस्करया गणपती उत्सवात नक्कीच भेट देऊ शकतो.